
ऑपरेशन टायगर’वर आदित्य ठाकरेंचा सणसणीत टोला!
दिल्लीत झालेल्या एकनाथ शिंदेंच्या सत्कार सोहळ्यात ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांची हजेरी लावली होती. यावेळी एकनाथ शिंदे यांचा शरद पवारांच्या हस्ते सन्मान करण्यात आला होता.त्यानंतर राजकीय वर्तुळात मोठा वाद पेटला. या कार्यक्रमात शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचं कौतूक देखील केलं होतं. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात वादंग रंगला होता. त्यावर बोलताना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी टोला लगावला. ऑपरेशन टायगरवरून देखील आदित्य ठाकरेंनी टीका केली.आज मी शरद पवार यांना भेटणार नाही. पण मी दिल्लीत खासदारांना भेटणार आहे. जेवढ्यांना फोडा आहे त्यांना फोडा. फोडाफोडीमध्ये त्यांचाच वेळ जातोय. यांचा स्वार्थीपणा आणि हावरटपणा संपणार नाही, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी टोला लगावला. तर ऑपरेशन टायगर कोण करतंय? तुम्ही करताय का? म्हणत आदित्य ठाकरेंनी संजय राऊंताना प्रश्न केला. त्यावेळी पत्रकार परिषदेत हशा देखील पिकला.संजय दीना पाटील तिथं कशासाठी गेले यावरून नुसतीच चर्चा करतायेत, पण संजय दीना पाटील शरद पवारांसाठी तिथं गेले असतील, असं आदित्य ठाकरे म्हणाले. कुणी कुणाचं कौतूक करावं, हा ज्याचा त्याचा निर्णय आहे, असंही आदित्य ठाकरे म्हणाले. काही लोक स्वार्थासाठी तिकडे गेले, असंही आदित्य ठाकरेंनी यावेळी म्हटलं आहे.भाजपच्या निवडणुकीच्या विजयात निवडणूक आयोगाचा मोठा हात आहे, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केले आहे. मतदानचा घोळ लोकांना कळला पाहिजे, असंही आदित्य ठाकरे म्हणाले. एव्हीएमवर सध्या टीका होताना दिसतीये. देशातील निवडणुका पारदर्शी होतात का? असा सवाल देखील आदित्य ठाकरे यांनी विचारला.