
राजापुरातील उड्डाण पुलाचे एका बाजूचे रखडलेले काम त्वरित मार्गी लावा, सर्वपक्षीय स्थानिक पदाधिकार्यांची मागणी.
राजापूर शहरातील एसटी डेपोसमोरील उड्डाण पुलाच्या एका बाजूकडील रखडलेले काम सुरू झाले असले तरी हे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांमध्ये सदरचे काम पूर्ण न झाल्यास १ मे रोजी आंदोलन छेडण्याचा इशारा सर्वपक्षीय स्थानिक पदाधिकार्यांकडून देण्यात आला आहे.माजी नगराध्यक्ष ऍड. जमीर खलिफे, भाजपचे अरविंद लांजेकर, विवेक उर्फ़ पिंट्या गुरव यांनी सोमवारी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कनिष्ठ अभियंता कुमावत यांच्यासोबत रखडलेल्या या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी संथ काम तत्काळ पूर्ण करून उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजूकडील वाहतूक सुरू करावी, अशी मागणी केली.www.konkantoday.com