
मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर तालुक्यात दिशादर्शक फलक नसल्याने वाहन चालक संभ्रमात.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यात चौपदरीकरणाच काम सुरू आहे. मात्र दिशादर्शक फलक नसल्याने तसेच मातीचे ढीग रस्त्यालगतच टाकण्यात आल्याने वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. यामुळे अपघात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.महामार्ग ठेकेदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे वाहन चालकांचे हाल होत असून त्वरित योग्य उपाययोजना न केल्यास ठेकेदाराला शिवसेना स्टाईलने जाब विचारला जाईल, असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष संघटक संतोष थेराडे आणि अरविंद जाधव यांनी इशारा दिला आहे.www.konkantoday.com