निलेश महादेव आखाडे यांना नवराष्ट्र रत्नागिरी – सिंधुदुर्ग यांच्याकडून दिला गेला आदर्श युवा नेतृत्व पुरस्कार

रत्नागिरी : नवराष्ट्र रत्नागिरी सिंधुदुर्ग यांच्याकडून विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या लोकांना वेगवेगळे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. दरवर्षी हा सोहळा साजरा केला जातो व सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, कृषी विषयक अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यावर्षी देखील रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेकांना वेगवेगळ्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम केल्याबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

रत्नागिरी शहरातील भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व निलेश महादेव आखाडे यांना यावर्षी नवराष्ट्रचा युवा नेतृत्व पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. हा पुरस्कार सोहळा नुकताच रत्नागिरी येथील सावंत पॅलेस येथे संपन्न झाला. महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री, रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदयजी सामंत, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.

निलेश आखाडे हे भारतीय जनता पार्टीचे आयटी जिल्हा संयोजक असून के भटके विमुक्त आघाडीचे जिल्हा संयोजक ही आहेत. विविध क्षेत्रात त्यांनी नाविन्यपूर्ण कामगिरी केली असून. महाराष्ट्र समविचारी मंचच्या माध्यमातून अनेक आंदोलने आजपर्यंत त्यांनी केली आहेत. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तळमळीने काम केले आहे. कोणत्याही विषयावर सडेतोड प्रतिक्रिया आजपर्यंत ते देत आले आहेत. भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व म्हणून आज त्यांच्याकडे पाहिले जात आहे. रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक ६ मध्ये ते सक्रियपणे काम करत आहेत. विविध सामाजिक क्षेत्रात नावीन्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दल त्यांना हा आदर्श युवा नेतृत्व पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. सर्वत्र त्यांची कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button