जोपर्यंत इस्लाम टिकेल तोपर्यंत कोणतेही राज्य, जग सुसंस्कृत होणार नाही-निर्वासित बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन

जोपर्यंत इस्लाम टिकेल तोपर्यंत कोणतेही राज्य, जग सुसंस्कृत होणार नाही, असे परखड मत निर्वासित बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी मांडले आहे.जम्मू- काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात हिंदू पर्यटकांना लक्ष्य करून ठार करण्यात आले. पर्यटकांवर गोळीबार करताना त्यांची ओळख पटविण्यात आली. ते मुस्लिम नाहीत, हिंदू आहेत हे पाहूनच त्यांना मारण्यात आले. सध्या दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे.जगभरातून या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला जात असून दहशतवादाविरोधात भारतासोबत उभं राहण्याचे आश्वासन अनेक देशांनी दिले आहे.

हा भ्याड हल्ला झाल्यानंतर निर्वासित बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनीही त्यांचे परखड मत ट्वीट करून व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘जोपर्यंत इस्लाम टिकेल तोपर्यंत दहशतवाद टिकेल. जोपर्यंत इस्लाम टिकेल तोपर्यंत गैर-मुस्लिमांना सुरक्षित राहता येणार नाही, मुक्त विचारवंतांना आणि बुद्धिवादी लोकांना सुरक्षित राहता येणार नाही, महिलांना सुरक्षित राहता येणार नाही. जोपर्यंत इस्लाम टिकेल तोपर्यंत फुले सुकतील, मुले मरत राहतील, लाखो मृत पावत राहतील. इस्लामच्या गर्भाशयातून द्वेष जन्माला येत राहील, कुरूप राक्षस जन्माला येत राहतील. जोपर्यंत इस्लाम टिकेल तोपर्यंत कोणतेही राज्य सुसंस्कृत होणार नाही, जग सुसंस्कृत होणार नाही,’ असे स्पष्ट मत तस्लिमा नसरीन यांनी मांडले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button