उन्हाळा वाढल्याने पाणीटंचाई वाढली, जिल्ह्यात ११ हजार ४७० ग्रामस्थ पाणी टंचाई ग्रस्त.

रत्नागिरी जिल्ह्यात उन्हाच्या असह्य झळांनी पाणी टंचाईचा दाह दिवसागणिक तीव्र होऊ लागला आहे. प्रामुख्याने रत्नागिरी, चिपळूण आणि खेड या तीन तालुक्यांना पाणी टंचाईने ग्रासले आहे. या तीन तालुक्यातील एकूण १५ गावातील ३८ वाड्यांमधील ११ हजार ४७० . ग्रामस्थांची तहान भागवण्यासाठी आतापर्यंत ७ टँकरच्या ३६४ फेर्‍यांनी पाणीपुरवठा करण्यात आला आहे.रत्नागिरीत ५ गावातील २५ वाड्यांना ५ टँकर, चिपळूण तालुक्यात ८ गावातील ११ वाड्यांना एक टैंकर तर खेडमध्ये २ गावातील २ वाड्यांना एका टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button