
रत्नागिरी पालिकेचे नवे मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी पदभार स्वीकारला.
रत्नागिरी पालिकेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी कर्जतहून वैभव गारवे यांनी आज पदभार घेतल्याने बाबर कार्यमुक्त झाले.तुषार बाबर यांनी चार वर्षे पालिकेचा कारभार सांभाळला. रत्नागिरीकरांनी मला भरभरून प्रेम दिले, सहकार्य केल्याबद्दल त्यांना मी धन्यवद देतो, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली..