
रत्नागिरीनजिकच्या चर्मालय नाक्यातील महामार्गावर सब-वे आवश्यक.
रत्नागिरी मिर्या-नागपूर महामार्ग हा रत्नागिरी शहरातून कोकणनगरकडे जाणार्या शहरातील चर्मालय येथील चार रस्त्याच्या मधून जातो. परंतु, या ठिकाणी कोणताही भुयारी मार्ग (सब-वे) किंवा पर्यायी रस्ता ठेवण्यात आलेला नसल्याचे महामार्गाच्या नकाशावरून दिसत आहे. यामुळे वाहनचालकांना आता कोकणनगरकडे जाण्यासाठी चंपक मैदान मार्गे वळसा मारावा लागणार की कोकणनगरकडून शहराकडे येताना साळवी स्टॉप येथून वळसा मारावा लागणार, या बाबत संभ्रम आहे.
नवीन महामार्गामुळे रत्नागिरी शहरातून कोकणनगरकडे जाणार्या वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. कोकणनगरकडे जाणार्या वाहनचालकांची अडचण म्हणजे शहरातून कोकणनगरकडे जाणारा हा महामार्ग शहरातील चर्मालय येथील चार रस्त्याच्या मधून जातो. परंतु, येथे कोणताही भुयारी मार्ग (सब-वे) किंवा पर्यायी रस्ता ठेवण्यात आलेला नसल्याचे महामार्गाच्या नकाशावरून दिसत आहे. त्यामुळे येथे नव्या महामार्गामुळे वाहनचालकांना वळसा मार्गामुळे जाण्या-येण्यासाठी लागणारा वेळ आणि इंधन खर्चही वाढणार असल्याचे बोलले जात आहे. स्थानिक नागरिक व नियमित प्रवास करणार्या वाहनचालकांमध्ये प्रकल्पामुळे रत्नागिरी शहर आणि परिसरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्याची अपेक्षा आहे. चर्मालय येथील चार रस्त्याच्या परिसरात सध्याच्या वाहतूक व्यवस्थेनुसार महामार्गावरूनच शहरातील वाहतूक कोकणनगरकडे सुरू ठेवल्यास अपघाताची शक्यता मोठ्या प्रमाणात व्यक्त होत आहे. चर्मालय नाक्याच्या ठिकाणी मिर्या-नागपूर महामार्गाच्या मधोमध वाहने थेट क्रॉस करणे धोकादायक ठरू शकते. यामुळे स्थानिक नागरिकांनी येथे भुयारी मार्ग (सब-वे) बांधण्याची मागणी लावून धरली आहे. सब-वेमुळे वाहतूक सुरक्षित होईल व वाहनचालकांना वळसा मारण्याची गरज भासणार नाही, असे स्थानिकांचे मत आहे.www.konkantoday.com