
अपघातग्रस्तांसाठी 1 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार.
महाराष्ट्र राज्य सरकारने आणि आरोग्य विभागाने अपघातग्रस्तांसाठी सर्वात मोठा अन् महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे अपघातग्रस्तांवर एका लाखांपर्यंतचे कॅशलेस उपचार होणार आहेत तसेच राज्यातील आणि परराज्यातील व्यक्तीचा महाराष्ट्रात अपघात झाल्यास त्याला कोणत्याही रुग्णालयात उपचारघेण्यात येतील, असा मोठा निर्णय आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी घेतला आहे.राज्यात गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे सत्र सुरु आहे. भीषण अपघातांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागल्याच्या घटना वारंवार घडत आहेत.
अशातच राज्याच्या आरोग्य विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अपघात ग्रस्तांवर आता एक लाख रुपयांचे मोफत उपचार होणार असून त्यासाठी राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून एक लाखापर्यंतचे कॅशलेस उपचाराची तरतूद करण्यात आली आहे.त्याचबरोबर राज्यातील आणि परराज्यातील व्यक्तीचा महाराष्ट्रात अपघात झाल्यास त्याला कोणत्याही रुग्णालयात उपचार घेता येणार आहेत, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर रूग्णालयांची माहिती, बेडची उपलब्धता व तक्रारीसाठी स्वतंत्र मोबाईल ॲप तयार करण्यात येणार असल्याची माहितीही आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.