
कोयनेचे अवजल मुंबईकडे वळवण्याच्या हालचालींना वेग
कोयना धरणातील वीजनिर्मितीनंतर शहरातील वाशिष्ठी नदीमार्गे अरबी समुद्रात सोडले जाणारे ६७ टीएमसी अवजल मुंबईकडे वळवण्याचा प्रस्ताव आहे. त्यादृष्टीने आता पाटबंधारे विभागाकडून कार्यवाही सुरू झाली आहे. पाणी वापराकरिता पूर्व व्यवहार्यता अहवाल तयार करण्याकरिता कळंबस्ते येथे नुकताच वाशिष्ठी नदी किनारी दिल्ली येथील संस्थेकडून मृदा परीक्षणाबरोबर भूगर्भ चाचणी घेण्यात आली.
गेल्या अनेक वर्षानंतर कोयना अवजलाचा पुनर्वापर करण्यावर सकारात्मक चर्चा सुरू झाली आहे. कोयना धरणातील जलविद्युत निर्मितीनंतर कोळकेवाडी धरणातून वाशिष्ठी नदीमार्गे समुद्राला वाया जाणारे पाणी हे भविष्यात सिंचन, बिगर सिंचन वापराकरिता वळवणे प्रस्तावित आहे. वाशिष्ठी नदीतून हे पाणी सुमारे १६० कि.मी. अंतरावर असलेल्या मुंबईला जलवाहिन्यांद्वारे नेण्यावर नियोजन करण्याचे काम करण्यात येत आहे. त्यासाठी ३८ कोटी खर्चाचे काम हवाई सर्व्व्हेक्षण व्हॅसकॉम कंपनीच्या माध्यमातून पूर्ण केले आहे.www.konkantoday.com