मालगुंडवासियांची विनंती मान्य, मालगुंड होणार पुस्तकांचे गाव.

मागील अनेक वर्षापासून असलेली मालगुंडवासियांची विनंती शासनाने मान्य केली असून मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली मालगुंड हे गाव पुस्तकांचे गाव होणार आहे. त्यासाठी आवश्यक ते नियोजन करण्यासाठी कवी केशवसुत स्मारक मालगुंड येथे पूर्वनियोजन सभा नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली.या सभेत २० तारखेच्या उदघाटन आणि लोकार्पण सोहळ्यासाठी आवश्यक असणार्‍या बाबी, उपस्थिती, रॅली पुस्तकांच्या दालनाचे उदघाटन, त्यासाठी आवश्यक सर्व घटकांची माहिती उपस्थितांना देण्यात आली.

तसेच सदर उदघाटन व लोकार्पण सोहळा उत्साहाच्या वातावरणात करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी कोकण मराठी साहित्य परिषदेचे विश्‍वस्त प्रमुख रमेश कीर, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा नमिता कीर, कवी केशवसुत स्मारकाचे अध्यक्ष गजानन पाटील, सरपंच श्‍वेता खेऊर, रत्नागिरी पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश साळवी, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या युवाशक्तीच दक्षिण कोकण विभाग प्रमुख अरूण मोर्ये, कवी केशवसुतर स्मारक व्यवस्थापन समितीचे सदस्य शेखर खेऊर, कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालगुंडच्या कार्याध्यक्षा शुभदा मुळ्ये, मालगुंड शाखेचे सचिव विलास राणे, मालगुंड शाखेचे सहसचिव रामानंद लिमये, पत्रकार वैभव पवार, यांच्यासह मोठ्या प्रमाणात सदस्यांची उपस्थिती होती.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button