
महावितरणने बागेतून उच्चदाब वीज वाहिनी टाकल्यामुळे वाहने, मजूर, कुटुंबियांना धोका.
राजापूर तालुक्यातील बारसू परिसरात बागेतून गेलेल्या ३३ के.व्ही. क्षमतेच्या वीज वाहिनीमुळे आंबा बागेला तसेच या ठिकाणी ये-जा करणारी वाहने, काम करणारे मजूर व कुटुंबियांनाही धोका निर्माण झाला आहे. या वीज वाहिनीची उंची वाढवावी किंवा ती बागेच्या बाहेरून न्यावी, अशी मागणी बारसू येथील आंबा बागायतदार जाधव यांनी केली आहे. याबाबतचे एक लेखी निवेदन त्यांनी महावितरणचे रत्नागिरीतील कार्यकारी अभियंत्यांना दिले आहे.तेरवण तिठा बारसू येथील सर्व्हे नं. १५९ मध्ये आपली आंब्याच्या कलमांची बाग आहे.
या बागेमधून महावितरणची ३३ केव्ही वीजवाहिनी गेली आहे. मुख्य रस्त्यावरून बागेतील घरामध्ये जाणार्या रस्त्याचया दोन्ही बाजूकडील विद्युत खांब हे सखल भागात आहेत आणि आतमध्ये येणार्या रस्त्यांचा भाग उंचावर आहे. त्यामुळे आतमध्ये जाणार्या रस्त्यावरील वीजवाहिन्यांची उंची साधारण ४.५ ते ५ मीटर इतकी उंच असल्यामुळे ये-जा करणार्या आपल्या वाहनांना ही वीजवाहिनी टेकू शकते. त्यामुळे जीवितहानीही घडू शकते.www.konkantoday.com