मंत्री नितीन गडकरी यांनी टोलबाबत मोठी घोषणा केलीय. १५ दिवसात अशी पॉलिसी येईल की टोलबाबत कोणतीच तक्रार राहणार नाही


केद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टोलबाबत मोठी घोषणा केलीय. १५ दिवसात अशी पॉलिसी येईल की टोलबाबत कोणतीच तक्रार राहणार नाही असं नितीन गडकरी यांनी म्हटलं. मुंबईत दादर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर ते अमर हिंद मंडळाच्या व्याख्यानामालेत उपस्थित होते.नितीन गडकरी यांनी व्याख्यानमालेत बोलताना टोलबाबत म्हटलं की, मी टोलबद्दल जास्त सांगणार नाही. मात्र १५ दिवसात अशी पॉलिसी येईल की तुमची काहीच तक्रार राहणार नाही. हे मी महाराष्ट्रातल्या टोलबद्दल बोलत नाहीय. एनएचआय, राष्ट्रीय महामार्गाबद्दल बोलतोय असंही त्यांनी स्पष्ट केलं.आता टोलनाके राहणार नाहीत. मात्र सॅटेलाइट सिस्टिमद्वारे तुम्ही तिथून गेल्यानंतर तुमच्या नंबरप्लेटवरून बँक खात्यातले पैसे कट होतील. पुढच्या दोन वर्षात इंडियन रोड इन्फ्रा अमेरिकेपेक्षा चांगले होईल. मुंबई गोवा महामार्गही जून महिन्यापर्यंत पूर्ण होईल अशी माहिती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button