घरातून कोणाला न सांगता निघून गेलेल्या तरुणाचा मृतदेह राजापूर तालुक्यातील कशेळी समुद्रकिनारी पाण्यात बुडालेल्या अवस्थेत मिळाला.

राजापूर तालुक्यातील कशेळी समुद्रकिनारी पाण्यात कुसगे येथे एका २८ वर्षीय तरुणाचा मृतदेह समुद्राच्या पाण्यात बुडालेल्या अवस्थेत आढळून आला प्रतिक तुकाराम आंबेरकर ( २८ वर्षे, रा. कशेळी तेलीवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, प्रतिक आंबेरकर हा ११ एप्रिल रोजी सकाळी साडेनऊ वाजता घरातून कोणाला काही न सांगता निघून गेला होता. कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला, परंतु तो सापडला नाही. अखेर शनिवार १२ एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजता कशेळी समुद्रकिनारी कुसगे येथे ते समुद्राच्या पाण्यात मृत अवस्थेत आढळून आले.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. नाटे पोलिसांनी या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button