आधी लोकांच्या शंकांचे निरसन करा आणि मगच विकास आराखडा मंजूर करा- लांजा शहरातील नागरिकांची मागणी

आधी लोकांच्या शंकांचे निरसन करा आणि मगच विकास आराखडा मंजूर करा, अशी आग्रही मागणी लांजा शहरातील नागरिकांच्या वतीने नगरपंचायतीकडे करण्यात आली आहे .लांजा नगरपंचायत प्रशासनाकडून नगरपंचायत कार्यक्षेत्रातील नागरिकांना कोणतीही माहिती न देताच शहराचा प्रारूप विकास योजना आराखडा (डीपी प्लॅन) जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रशासनाच्या भूमिकेवर लांजा शहर परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत नगरपंचायत प्रशासनाला निवेदन सादर केले आहे .या निवेदनात म्हटले आहे की, लांजा नगरपंचायत प्रशासनाने लांजा शहराचा प्रारूप विकास योजना आराखडा जाहीर केला आहे.

लांजा नगरपंचायत इमारतीच्या दर्शनी बाजूस नागरिकांना हरकती घेण्यासाठी तो सादर केलेला आहे .मात्र या शहर विकास आराखड्याबाबत नगरपंचायतीच्या हद्दीतील ग्रामस्थांना किंवा भूधारक शेतकरी यांना कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही. हे सर्वजण या विकास आराखड्याबाबत अनभिज्ञ आहेत त्यामुळे एक प्रकारे तो बळजबरीने पूर्ण करण्याचा किंवा तो ग्रामस्थांवर लादण्याचा हेतू नगरपंचायत प्रशासनाचा असल्याचे यावरून दिसून येते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button