नारायण राणेंना अटक केलेला जो क्षण आजही माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवला आहे. ज्या दिवशी परत फेड करेन त्याच दिवशी डिलीट मारणार- मंत्री नितेश राणे यांचे खुले आव्हान.

महाविकास आघाडीच्या काळात नारायण राणे यांना उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. नारायण राणेंना जेवणाच्या ताटावरून उठवून अटक करण्यात आली होती.जेवण करत असताना देखील अटक करण्यासाठी शिवसेना नेते अनिल परब यांनी भाग पाडलं होतं, याची आठवण मंत्री नितेश राणे यांनी करुन दिली आहे. वडील नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त ते बोलत होते.नारायण राणेंना अटक केलेला जो क्षण आजही माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवला आहे.

ज्या दिवशी परत फेड करेन त्याच दिवशी डिलीट मारणार. कुणालाच सोडणार नाही. तो क्षण टप्प्याटप्याने जवळ आलेला आहे. कोण कुठे जात नाही, सर्वांना हिशेब इथेच होणार आहे. राणे साहेबांना ज्यांनी ज्यांनी त्रास दिला कुणीही सुटणार नाहीत,”, असं नितेश राणेंनी बोलून दाखवलं.दहा वर्षाच्या प्रवासामध्ये सगळ्या गोष्टी अनुभवायला, पाहायला मिळाल्या. सिंधुदुर्गाचे पालकमंत्री दीपक केसरकर असताना त्याच्या आशीर्वादाने दोडामार्ग जेल देखील पाहिलं आहे. मात्र त्यांनी लोकसभेला जी आम्हाला साथ दिली, त्यामुळे ते सगलं जुनं पुसलं गेलं आहे. तिसऱ्या कोणालातरी खुश करण्यासाठी त्यांनी हे केलं होतं, त्यांचं आमच्याशी कधीच वैर नव्हतं, असं देखील नितशे राणेंना म्हटलं आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button