सौदी अरेबियानेभारत आणि पाकिस्तानसह 14 देशांच्या तात्पुरत्या व्हिसावर बंदी घालण्याचा निर्णय.

आता सौदी अरेबियानेही मोठा निर्णय घेतला आहे. भारत आणि पाकिस्तानसह 14 देशांच्या तात्पुरत्या व्हिसावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये उमरा, व्यवसाय आणि कुटुंब व्हिसावर बंदी घालण्यात आली आहे. सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने हा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. हे निर्बंध जूनपर्यंत कायम राहणार असून ज्यांच्याकडे उमरा व्हिसा आहे ते 13 एप्रिलपर्यंत सौदी अरेबियात प्रवेश करू शकतात. या वर्षीच्या हज यात्रेच्या आधी सौदी अरेबियाने हा मोठा निर्णय घेतला.

सौदी अरेबियामधील अधिकाऱ्यांनी या निर्णयासंदर्भात माहिती देताना सांगितले की, हज यात्रेशी संबंधित गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि योग्य नोंदणी केल्याशिवाय देशात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींना रोखण्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच गेल्या वर्षी हज यात्रेत उष्णतेमुळे अनेकांच्या मृत्यूची घटना घडली होती. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती त्यांनी सांगितली. या संदर्भातील वृत्त देनात आले आहे.दरम्यान, 2024 मध्ये हज यात्रा करताना तीव्र उष्णतेमुळे अनेक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तसेच तेव्हा अनेक हज यात्रेकरूंनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती, तसेच अनेकांनी नोंदणी देखील केली नसल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे अशा घटना टाळण्याच्या अनुषंगाने आता सौदी अरेबिया सरकार उपयायोजना करत असल्याचं सांगितलं जात आहे. या संदर्भात सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्‍मद बिन सलमान यांनी योग्य ते निर्देश दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button