
तरीही आम्ही भाजप नेत्यांना चंपा किंवा टरबूजा म्हणणार नाही, काँग्रेसच्या नेत्यांचे प्रत्युत्तर
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस नेते नाना पटोले यांचा उल्लेख पप्पु असा केला होता. नाना पटोले हे महाराष्ट्रातील पप्पू आहेत अस चंद्रकांत पाटील यांनी म्हणल्यानंतर आता नाना पटोले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. चंद्रकांत पाटील काहीही बोलले तरी आम्ही भाजप नेत्यांना चंपा किंवा टरबूजा म्हणणार नाही असा टोला त्यांनी लगावला.
नाना पटोले म्हणाले, चंद्रकांत पाटलांनी आमच्यावर कितीही खालच्या पातळीवर जाऊन टीका करावी. त्यांनी आमच्यावर केलेल्या टीकेमुळे पेट्रोल, डिझेल व जीवनाश्यक वस्तूंचे दर कमी होणार असतील, देशातील सर्व नागरिकांना मोफत कोरोना प्रतिबंधात्मक लस मिळणार असेल.मोदी सरकारने आणलेले तीन शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द होणार असतील. केंद्र सरकारने जाणिवपूर्वक कोर्टाच्या माध्यमातून रद्द केलेले मराठा आणि ओबीसी आरक्षण मिळणार असेल तर चंद्रकांत पाटलांच्या टीकेचे स्वागतच आहे.’ असं देखील नाना पटोलेंनी म्हटलं आहे.
www.konkantoday.com