
ग्रामीण भागातील मुलांसाठी झी मराठी आणि श्रेयस तळपदे यांचे व्यासपीठ उपलब्ध : मयुरेश अभ्यंकर.
आबलोली : “झी मराठी”वर सुरू झालेल्या “चल भावा सिटीत..! या श्रेयस तळपदे यांच्या रिॲलिटी शोच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्वसामान्य मुलांना झी मराठी आणि श्रेयस तळपदे यांनी एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचे काम केले आहे. त्याचसाठी आम्ही आंबलोली येथेही आलो आहोत. हा कार्यक्रम प्रत्येकाने पाहावा, असे जाहीर आवाहन ‘झी मराठी’ रिॲलिटी शोचे nivefk मयुरेश अभ्यंकर यांनी आबलोली येथील पत्रकारांशी बोलताना केले आहे.
गुहागर तालुक्यातील आबलोली कोष्टेवाडी येथील मधुकर रेपाळ यांच्या घरासमोरील पटांगणात मराठी नवीन वर्षाचे औचित्य साधून खास महिलांसाठी “खेळ मनोरंजनाचा..!”, “खेळातून बक्षीसे जिंकण्याचा..!”, आता कस वाटतयं, सिटीत नाव गाजतयं “, ” आता कस वाटतयं सिटीत आबलोली गाव गाजतयं “, “चल भावा सिटीत..!” हा झी मराठीचा नवीन रिॲलिटी शो नुकताच आबलोली गावात उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. त्यानंतर रिॲलिटी शोचे निवेदक मयुरेश अभ्यंकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, “१५ मार्चपासून दररोज रात्री ९.३० वाजता झी मराठी वर हा कार्यक्रम बघता येणार आहे. गुहागर तालुक्यातील आबलोली गावात आम्हाला यायला उशीर झाला त्याचे कारण प्रवासात आम्हाला खूप अडचणी आल्या. त्यामुळे कार्यक्रम चालू व्हायला खूप उशीर झाला. इथे आल्यानंतर कार्यक्रमासाठी महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती बघून आमचा सर्व कंटाळा दूर झाला.
आपल्या उपस्थितीबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो. आम्ही ५-५, ६-६ तास प्रवास करतो. कधी कधी रात्री आम्हाला झोप सुद्धा मिळत नाही आणि सकाळी त्याच उत्साहाने आम्हाला कार्यक्रमासाठी उभे राहावे लागते. इव्हेंट ॲरेंज करावा लागतो; पण उपस्थिती बघून आमचा थकवा गायब होतो आमच्या अंगात नवीन जोश संचारतो.” यावेळी व्यासपीठावर विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजन मंडळ आबलोली या मंडळाचे अध्यक्ष महेंद्र रेडेकर, उपाध्यक्ष अजित रेपाळ, पत्रकार संदेश कदम आदी उपस्थित होते.