राज्यात अधिकाधिक उद्योगधंदे उभारले जाऊन राज्य कशाप्रकारे उद्योगामध्ये अग्रेसर राहील यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी घेतली आढावा बैठक.

उद्योग विभागाच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्याची अंमलबजावणी व सद्यस्थिती याबाबत आज मंत्रालयात आढावा बैठक राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी उद्योग विभागाने 100 दिवसांच्या कालावधीमध्ये कोणकोणत्या उद्दिष्टपूर्ती केल्या व 100 दिवसांमध्ये कार्यालयातील सुधारणांबाबत आढावा घेतला.उद्योग विभागाच्या मार्फत राज्यात आलेल्या उद्योगांना कोणकोणत्या सुविधा सरकारच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आल्या. नवीन आलेल्या उद्योगांची उभारणी कशा पद्धतीने होत आहे, त्यांना येणाऱ्या अडीअडचणीबाबत मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी आढावा घेतला.

कार्यालयीन स्तरावरून कोणकोणत्या सुविधा देण्यात आल्या व त्याबाबत सद्यस्थिती काय आहे किंवा भविष्यात आणखीन काय सुधारणा करण्यात येईल याबाबतही मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी आढावा घेतला.राज्यात अधिकाधिक उद्योगधंदे उभारले जाऊन राज्य कशाप्रकारे उद्योगामध्ये अग्रेसर राहील यादृष्टीने सर्वोतपरी प्रयत्न करण्यात आले पाहिजेत यादृष्टीने या बैठकीत चर्चा झाली व त्यादृष्टीने सर्वांनी कामाला लागण्याच्या सूचना यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button