राजापूर शहरवासियांना पाणी पुरवठा करू शकणार्‍या कोदवली धरणाचे काम अपूर्णच.

राजापूर शहरवासियांना मुबलक पाणीपुरवठा करता यावा व दरवर्षीची पाणीटंचाई समस्या दूर व्हावी, यासाठी शहराला नैसर्गिकरित्या पाणीपुरवठा करणार्‍या कोदवली येथील सायबाच्या धरणाच्या खालील बाजूला नवीन धरणाचे काम गेली चार वर्षे सुरू आहे. मात्र प्रारंभी निधी अभावी रखडलेले हे काम आता अन्य तांत्रिक बाबींच्या पूर्ततेमध्ये अडकले आहे. त्यामुळे यावर्षीही हे काम पूर्ण होण्याची शक्यता धूसर असल्याने शहरवासियांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.राजापूरात दरवर्षी पावसाळ्यात अर्जुनाला पूर आणि उन्हाळ्यात पाणीटंचाई असे विदारक चित्र पहावयास मिळते.

दूरदृष्टी आणि नियोजनाचा अभाव यामुळे गेली कित्येक वर्षे उन्हाळ्यात शहरवासियांवर पाणी पाणी करण्याची वेळ येथे कोदवली येथील सायबाचे धरण व शीळ येथील जॅकवेल या दोन स्त्रोतांवर राजापूर शहराचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. मात्र सायबाचे धरण गाळाने भरल्याने या ठिकाणाहून येणारा पाण्याचा प्रवाह कमी झाला आहे. तर शीळ जॅकवेलमधून विद्युत पंपाने पाणी खेचावे लागत असल्याने त्याचा आर्थिक भुर्ंदंडही मोठा बसत आहे. त्यातच जीर्ण वितरण व्यवस्थेचा फटका पाणीपुरवठ्यावर होत असून नागरिकांना उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करण्याशिवाय पर्याय उरत नाही.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button