
यंदाच्या हंगामातील पहिल्यांदा हापूस आणि केशर आंबा युरोपीय बाजारात.
यंदाच्या हंगामातील पहिल्यांदा हापूस आणि केशर आंबा युरोपीय बाजारात निर्यात करण्यात आला आहे. सरकारच्या मेगानेट या प्रणालीद्वारे देशातील निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी झाली असून देशात महाराष्ट्र राज्य अव्वल असून राज्यात १७ हजार ६९१ शेतकर्यांची नोंदणी केली आहे. त्यामध्ये रत्नागिरीतील १९९६ शेतकर्यांनी नोंदणी करत देशात अव्वल स्थान पटकावले आहे.
यामुळे निश्चितच देशातील सर्वात जास्त आंबा उत्पादन आणि निर्यात ही महाराष्ट्र राज्यासह रत्नागिरी जिल्ह्यातून होणार आहे.भारतातील सर्वात जास्त आंबा उत्पादन हे महाराष्ट्रात होते. जे शेतकरी निर्यातक्षम आंबा उत्पादन करतात अशा शेतकर्यांनी आपल्या आंबा बागांची आणि शेतीचे नोंदणी मँगोनेट प्रणालीद्वारे करून घेतली आहे.www.konkantoday.com