
रत्नागिरी आणि परिसरातील कलाकारांना वाव मिळावा म्हणून रत्नागिरीत महानमन कार्यक्रमाचे आयोजन.
रत्नागिरी आणि परिसरातील कलाकारांना भव्य व्यासपीठ मिळवून देण्याच्या हेतूने येथील नमन मंडळातील कलावंतांचा एकत्रित सहभाग असलेले महानमन लवकरच रसिकांपुढे आणले जाणार आहे. या महानमनचे नियंत्रण गावोगावी जावून देण्यात येत आहे.कोकण ही भूमीच कलेची. कलाकारांची आहे. या लोककलेच्या माध्यमातून समाजप्रबोधनपर भाष्य, काल्पनिक, पौराणिक, ऐतिहासिक कथांच्या आधारे एक चित्तथरारक वगनाट्य सादर करीत नमनाचा सांगावा केला जातो. यातूनच महामानव निर्मितीतून कलावंताना व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयास आहे.
नमन या लोककलेची सातासमुद्रापार महती पोहचली आहे. यातूनच आता या महानमनी निर्मिती करण्यात आली आहे. हे महानमन सादरीकरणासाठी कोकण नमन कलामंच रत्नागिरी तालुका शाखा यांच्यातर्फे मेहनत घेण्यात येत आहे. येत्या २९ मार्च रोजी तालुक्यातील जाकादेवी येथे तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व २ एप्रिल रोजी डी. जे. सामंत महाविद्यालय पाली येथे या महानमनाचे सादरीकरण होणार आहे. रत्नागिरी येथे गतवर्षी झालेल्या नमन महोत्सवाला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. अनेक स्थानिक कलाकारांना एक व्यासपीठही मिळाले होते.www.konkantoday.com