
रत्नागिरी शहरात अकरावीत शिकणाऱ्या तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या.
रत्नागिरी शहरातील एका अल्पवयीन मुलीने ती शिकण्यासाठी राहात असलेल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. (ता. २२) दुपारी एका कॉलनीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. आत्महत्या करण्याचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलगी अकरावी विज्ञान शाखेत शिकत होती. तिची शहरातील एका कॉलनीमध्ये भाड्याने राहणाऱ्या तरुणाशी मैत्री होती. यातून त्या मुलाने मुलीला त्याच्यासोबत नेल्याची घटना दीड ते दोन वर्षांपूर्वी घडली होती. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल आहे. मुलीला महिला पोलिस अधिकाऱ्यांनी समजावून सांगितले होते.त्यानंतर ती मुलगी आपल्या आईकडे गेली, परंतु काही दिवसांनी पुन्हा ती मुलगी मित्राकडे आली. हा तरुण आपल्या आई-वडिलांसह त्या कॉलनीमध्ये भाड्याने राहतो.
वडील शासकीय नोकरीत असल्याचे समजते. त्यांच्याकडे ही अल्पवयीन मुलगी शिक्षणासाठी राहात असल्याचे मुलीच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली.कॉलनीतील घरात कोणीही नसताना आज दुपारी अचानक या मुलीने पंख्याला ओढणीने गळफास घेतला. घरी आल्यानंतर तरुणाच्या कुटुंबीयांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तिच्या आई-वडिलांनाही याची खबर दिली आणि मुलीला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले, परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले