
दापोली तालुक्यातील कोळथरे येथील माधव महाजन यांनी बनवली आंबा, काजू, फणस, कोकमपासून ‘व्वा ईन’ वाईन
. दापोली तालुक्यातील कोळथरे येथील माधव महाजन यांनी. तब्बल 13 वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर त्यांनी कोकणातील फळांपासून वाईन तयार केली आहे. लवकरच कोकणची ही ‘व्वा ईन’ बाजारात उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे, फळांचे नैसर्गिक गुण व पोषक द्रव्ये या वाईनमध्ये असल्याचा दावा महाजन यांनी केला आहे.गेली अनेक वर्षे माधव महाजन निर्मितीचाप्रयोग करीत होते. सुरुवातीच्या काळात शासनाची त्याला परवानगी नव्हती. पाच-दहा लिटरमध्ये? ? हे प्रयोग सुरू केले. तब्बल 13 वर्षे वेगवेगळ्या प्रकारची वाईन त्यांनी तयार केली. सुरुवातीच्या काळात येणार्या पर्यटकाला किंवा कोण मागेल त्याला अगदी मोफत ती दिली.
त्याची चव कशी आहे? किंवा आस्वाद असा आहे? याच्या चाचण्या घेतल्या. नंतर तर लोक विकत मिळेल का, असे विचारू लागले. त्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणात वाईन बनविण्याचा निर्णय घेतला आणि दुसर्या बाजूला शासनाची मंजुरी मिळावी, यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून पाठपुरावादेखील सुरू केला.कोकणात दरवर्षी वेगवेगळी फळपिके येतात. मात्र, फळप्रक्रियेअभावी ती फुकट जातात. यामध्ये आंबा, काजू, जांभूळ, करवंद, आवळा, कोकम अशा अनेक फळांचा समावेश असतो. अनेकदा कवडीमोल भावात बाहेर गावचे व्यापारी ती फळे खरेदी करतात. कधी आंबे कॅनिंगला द्यावे लागतात. त्यामुळे शेतकर्याला कष्ट करून फायदा मिळत नाही. कवडीमोल भाव मिळतो. म्हणून राज्य शासनाने या फळांपासून वाईननिर्मितीला परवानगी द्यावी, यासाठी अनेक वर्षांची मागणी होती.