आम्ही संविधानप्रेमी रत्नागिरीकरांच्या वतीने (२० मे) श्रद्धांजली रॅली

पहलगाम हल्ल्यातील मृतांना सलग २७ दिवस वाहिल्या जाणाऱ्या श्रद्धांजलीची सांगता; मारुती मंदिर येथून रॅलीची सुरुवात


रत्नागिरी : पहेलगाम हल्ल्यात २८ पर्यटकांचा बळी गेला होता. त्यानंतर आम्ही संविधान प्रेमी रत्नागिरीकरांच्या वतीने जयस्तंभ येथे सलग २८ दिवस मृतांना श्रद्धांजली वाहण्यात येत होती. याची सांगता (२० मे) श्रद्धांजली रॅलीने केली जाणार आहे.

दि. २२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पेहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांवर अमानुष हल्ला करून २८ नागरिकांची निर्घृण हत्या केली. या घटनेने व्यथित होऊन “आम्ही संविधान प्रेमी रत्नागिरीकर” नागरिक २४ एप्रिलपासून रत्नागिरी येथील जयस्तंभ येथे दररोज सायंकाळी ७ वाजता एकत्र येत मृतांप्रती श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.

आम्ही संविधान प्रेमी रत्नागिरीकरांच्या वतीने सलग २८ दिवस म्हणजेच २० मे पर्यंत सद्‌भावना व्यक्त करत आहेत. या स‌द्भावना, श्रध्दांजलीची सांगता (मंगळवार, २० मे) होणार असून सायंकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्य अर्पण करून हत्याकांडातील मृतांप्रती – श्रध्दांजली अर्पण केली जाईल. तेथून चालत घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून तेथून चालत जयस्तंभ येथे मृतांप्रती श्रध्दांजली अर्पण करून सलग २७ दिवस सुरू असलेल्या या श्रद्धांजली रॅलीची सांगता होईल.

या श्रद्धांजली रत्नागिरीकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन रॅलीत आम्ही संविधान प्रेमी रत्नागिरीकर नागरिक दीपक राऊत (9422429720), वल्लभ वणजु (8275271471) यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button