
ज्यांनी पोलिसांवर हात उचलला, त्यांना.’त्यांना पोलिसांचा धाक काय असतो, हे 100 टक्के दाखवणार _ गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं मोठ वक्तव्य.
नागपुरात ज्यांनी पोलिसांवर हात उचलला, त्यांना पोलिसांचा धाक काय असतो, हे 100 टक्के दाखवणार. कायदा हातात घेऊन अशी कृत्य करणाऱ्यांना सोडणार नाही. पोलिसांच मनोबल कमी होता कामा नये.ही आमची जबाबदारी आहे. पोलिसांवर हात उचलणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत” असं गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले.
नागपूरात जे काही घडलं, त्यावर सरकारची भूमिका काय? पोलिसांच मनोबल कसं वाढवणार? या प्रश्नावर योगेश कदम यांनी हे उत्तर दिलं.नागपूर घटनेचे व्हिडिओ व्हायरल होतायत, त्यावर काय म्हणालं? “एकच विनंती आहे, असे व्हिडिओ व्हायरल करुन काहीही साध्य होणार नाही. आपणच आपल्या महाराष्ट्राची बदनामी देशात करतोय. माझी विनंती आहे की, हे थांबलं पाहिजे” “फेसबुक, इन्स्टाग्राम कंट्रोल करता येतं, Whatsapp वर व्हायरल होणारे व्हिडिओ कंट्रोल करणं सायबरला देखील कठीण होतं” असं योगेश कदम म्हणाले.
औरंगजेबाच्या कबरीवरुन राज्यातील वातावरण तापलं आहे. सोमवारी याच मुद्यावरुन नागपुरात दोन गटात हिंसक संघर्ष झाला. वाहनं फोडण्यात आली. वाहनांना आगी लावण्यात आल्या. नागपूरच्या महाल भागात रस्त्यावर कशा प्रकारे हिंसाचार सुरु होता, त्याचे व्हिडिओ व्हायरल झालेत. मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली. पोलीस, अग्निशमन दलाचे जवान या हिंसाचारात जखमी झाले. त्यांच्यावर हल्ले करण्यात आले. औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्यावरुन राज्यातील वातावरण तापलं आहे.