
शक्तिपीठ महामार्ग लोकभावना डावलून रेटणार नाही. मंत्री नितेश राणे यांचे आश्वासन.
शक्तिपीठ महामार्ग असो किंवा कोणताही विकास प्रकल्प असो, सर्व लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय सरकार पुढे जाणार नाही. सरकार विकासासाठी आहे. कोणाचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी नाही.त्यामुळे शक्तिपीठ महामार्ग लोकभावना डावलून रेटणार नाही. नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा निश्चित प्रयत्न केला जाईल, असे मत मत्स्य व बंदर विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले.पालकमंत्री नितेश राणे शनिवारी वैभववाडी दौर्यावर आले होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना जिल्ह्यातून जाणार्या शक्तिपीठ महामार्गामुळे आंबोली घाटातील पर्यटन व जैवविविधतचे नुकसान होणार असल्याचे सांगत संपत देसाई यांनी यावर लोकप्रतिनिधींनी भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले होते. याबाबत आपली भूमिका काय, असा सवाल पालकमंत्र्यांना केला असता त्यांनी हे मत व्यक्त केले.