भैय्याजी जोशी यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे- उद्धव ठाकरे.

भैय्याजी जोशी यांच्या या वक्तव्यानंतर वातावरण चांगलंच तापलं आहे, भैय्याजी जोशी यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. ते मराठी -अमराठी विष कालवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण कोणी कितीही विष कालवलं तरी मुंबई महाराष्ट्रापासून हिसकू देणार नाही. मुंबई तोडण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. महाराष्ट्रात फूट पाडणारे ही लोक अनाजीपंत आहेत असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

दरम्यान भैय्याजी जोशी यांच्या या वक्तव्यामुळे आता भाजपची कोंडी होण्याची शक्यता आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील पोस्ट करत चांगलंच सुनावलं आहे. उद्धव ठाकरे यांनी तर या वक्तव्यानंतर हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button