
राज्य सरकारने इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पद्धती राज्यभर राबवण्यास दिली मान्यता.
राज्य सरकारने इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पद्धती राज्यभर राबवण्यास मान्यता दिली आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून राज्यातील सर्व क्षेत्रात मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने होण्यासाठी कार्यपद्धती सुनिश्चित केली आहे.अकरावीचे ऑनलाईन प्रवेश मुंबई, पुणे, नागपूर आदी महापालिका क्षेत्रामध्ये सुरू होते. आगामी शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व उच्च माध्यमिक तथा कनिष्ठ महाविद्यालयांना हीच प्रक्रिया लागू राहणार आहे.
ऑनलाईन प्रक्रियेसाठी राज्यस्तरावर पुण्यातील शिक्षण आयुक्तांनी नियंत्रण ठेवावे आणि प्रवेश प्रक्रियेची अंमलबजावणी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक स्तरावर करण्यात यावी.या प्रवेश प्रक्रियेत नियमित चार फेर्या पूर्ण झाल्यावर माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर सर्वांना खुले प्रवेश देण्यात येतील. हे प्रवेश गुणवत्तेच्या आधारावर देण्यात येतील. अकरावीमध्ये प्रवेशित होणार्या शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनेच होईल.www.konkantoday.com