रत्नागिरी शहर परिसरात व जिल्ह्यात श्री सदस्यांकडून हजारो टन कचर्‍याचे संकलन.

महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या (रेवदंडा-अलिबाग) श्री सदस्यांनी रविवारी रत्नागिरी शहर परिसर चकाचक केला. स्वच्छता अभियान राबवून हजारो किलो कचरा संकलित केला. रत्नागिरी शहरात १,५०० श्री सदस्यांनी सहभाग घेतला. या अभियानांतर्गत ७०८ किलो ओला कचरा आणि १७ हजार १३७ किलो सुका कचरा गोळा करण्यात आला.

हा कचरा नगर परिषदेच्या ताब्यात देण्यात आला.रत्नागिरी शहराजवळील कुवारबाव ते आरटीओ ऑफिस, त्यानंतर एसटी स्टँड, राम आळी, पर्‍याची आळी, गाडीतळ, कॉंग्रेस भवन नाका, टिळक आळी, आठवडा बाजार रोड, प्रमोद महाजन क्रीडा संकुल परिसर या सर्व भागांमध्ये कचरा गोळा करण्यात आला. सकाळी ८.३० वाजता श्री सदस्यांनी हाती झाडू घेवून कामाला सुरूवात केली. श्री सदस्यांना हातमोजे, मास्क देण्यात आले होते. या श्री सदस्यांनी केरसुणी हाती घेतली.

ओला कचरा, सुका कचरा गोळा करायला सुरूवात केली. साधारण १० वाजेपर्यंत ही सफाई मोहीम सुरू होती. आज देशभरात श्री सदस्यांनी स्वच्छता अभियान राबवले. रत्नागिरी तालुक्यातील श्री सदस्यांनी या मोहिमेत भाग घेतला. हे अभियान डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button