रत्नागिरी जिल्ह्यात पशुगणनेत १ लाख ३८ हजार ३०४ पशुधनाची नोंद.

रत्नागिरी जिल्ह्यात १ हजार ६९४ गावांमध्ये जि वनविभागाकडून राबवण्यात येत असलेल्या पशुगणनेचे आतापर्यंत ६०४ गावात पशुगणनेचे काम पूर्ण आले आहे. १२७पावामध्ये अजूनही या पशुगणनेला आरंभ झालेलर नाही. उर्वरित गावांमध्ये मात्र पशुगणना सुरु असून आतापर्यंत पशुधनची संख्या १ लाख ३८ हजार ३०४ तर पक्षीधनाची संख्या २ लाख ८६ हजार इतकी नोंद करण्यात आली आहे.केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत दर ५ वर्षांनी पशुगणना करण्यात येत असते. यावर्षी २५ नोव्हेंबरपासून जिल्ह्यात पशुगणनेस सुरूवात झाली आहे.

राज्य शासनाने २८ फेब्रुवारीपर्यंत पशुगणना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पशुसंवर्धन विभागासमोर ठेवले होते. मात्र, जवळपास, सर्वच तालुक्यातील काही गावे दुर्गमव डोगरी भागात आहेत त्यामुळे गणनेसाठी गेलेल्या प्रगणकांना नेटवर्कच्या अडचणी येत असलेल्या अडचणींमुळे या पशुगणना मोहिमेस केंद्र शासनाने ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button