
वातावरणातील बदलामुळे आंबा पिकावर परिणाम, यंदा जेमतेम २५ ते ३० टक्केच आंबा उत्पादन.
जिल्ह्याला अर्थार्जन मिळवून देणारे आंबा पीक यावर्षीही नैसर्गिक संकटात सापडले आहे. वातावरणातील बदलामुळे या वर्षी जेमतेम २५ ते ३० टक्केच आंबा उत्पादन झाले असून, योग्य दर न मिळाल्यास बागायतदारांची आर्थिक गणिते विस्कळीत होणार आहेत. गतवर्षी फेब्रुवारीमध्ये आंबा पेटी मुंबई, स्थानिक बाजारपेठेत विक्रीला आली होती.
यावर्षी फेब्रुवारीत आंबा आला, परंतु प्रमाण अत्यल्प आहे. मुंबई बाजारपेठेत रत्नागिरी जिल्ह्यापेक्षा सिंधुदुर्गातील देवगड हापूसचे वर्चस्व आहे. सध्या पेटीला १० ते १२ हजार रुपये दर मिळत आहे.www.konkantoday.com