संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात राजापूर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा.

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन २०२३-२४ मध्ये राजापूर तालुक्यातील कळसवली ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावला, तसेच गुहागर तालुक्यातील खामशेत ग्रामपंचायतीने द्वितीय, तर चिखली ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक मिळविला. तसेच आणखी तीन ग्रामपंचायतींना विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.या पुरस्काराची घोषणा मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केली आहे.

या अभियानातील जिल्हा परिषद गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या ग्रामपंचायतींमधून सर्वात जास्त गुण प्राप्त करणार्‍या ९ ग्रामपंचायतींची तपासणी जिल्हास्तरीय तपासणी समितीकडून करण्यात आली होती. त्यातून जिल्हास्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या ग्रामपंचायतींची नावे निश्‍चित करण्यात आली. प्रथम क्रमांक पटकावलेल्या कळसवली ग्रामपंचायतीला ६ लाख रुपये, द्वितीय क्रमांकाच्या खामशेत ग्रामपंचायतीला ३ लाख रुपये आणि चिखली ग्रामपंचायतीला ३ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button