गणपतीपुळे किनाऱ्यावर कासवमित्रांच्या विशेष सहकार्याने ४७ सागरी कासवपिल्ले समुद्रात सोडण्यात आली.

रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथील समुद्रकिनाऱ्यावर राबवण्यात येणाऱ्या सागरी कासव संरक्षण आणि संवर्धन मोहिमेंतर्गत कासवमित्रांच्या विशेष सहकार्याने ४७ सागरी कासवपिल्ले समुद्रात सोडण्यात आली.गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या अंडी उबवणी केंद्रात सुमारे १३७ समुद्री कासवांची अंडी संरक्षित करण्यात आली होती. त्यातील ४७ कासवांची पिल्ले सुरक्षित समुद्रात सोडण्यात आली आहेत.गणपतीपुळे येथे समुद्रकिनाऱ्यावर कांदळवन दक्षिण विभाग परिक्षेत्र रत्नागिरीच्यावतीने सागरी कासव संरक्षण आणि संवर्धन मोहीमअंतर्गत अंडी उबवणी केंद्रामध्ये कासवांच्या संरक्षित प्रजाती तयार केल्या जात आहेत.

त्यामध्ये ठेवण्यात आलेल्या घरट्यांमधील सुमारे ४७ कासवांची पिल्ले संरक्षित करण्यात आली होती. या पिल्लांना सुरक्षितरित्या गणपतीपुळे अंडी उबवणी केंद्रासाठी नियुक्ती करण्यात आलेले कासवमित्र वीरेंद्र सुर्वे व मालगुंड येथील कासवमित्र आदित्य मयेकर यांच्या विशेष कामगिरीने गणपतीपुळे समुद्रात सोडण्यात आली आहेत. या समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या केंद्रामध्ये सुमारे १३७ समुद्री कासवांची अंडी संरक्षित करण्यात आली होती. त्यातील ४७ कासवांची पिल्ले सुरक्षित समुद्रात सोडण्यात आल्याची माहिती सुर्वे यांनी दिली आहे. या केंद्रामध्ये पिल्ले घरट्यांमध्ये योग्य प्रकारे संरक्षित करण्यासाठी सुर्वे व मयेकर यांच्यावतीने विशेष काळजी घेण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button