
आदित्य ठाकरे राजकारणासाठी रस्त्यावर, मंत्री योगेश कदम यांचा आरोप.
दापोली-खेड रस्त्याचे नुतनीकरणाचे काम चालू असून फुरुस नजिक पर्यायी रस्ता खचला आहे. पालगड दस्तुरीमार्गे वाहतूक सुरू असून कोकणात १० मे पासून पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक रस्त्याची कामे ही वेळेत पूर्ण झालेली नाहीत. अतिवृष्टीमुळे जेथे नुकसान होत आहे तेथे आम्ही लक्ष ठेवून असून नागरिकांनी सतर्क राहावे व कृषि विभागाकडून आलेल्या सूचनेनंतरच शेतीची कामे करावीत, असे आवाहन गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम यांनी केले.आदित्य ठाकरे मुंबईचे पालकमंत्री होते त्यावेळीही मुंबईमध्ये पाणी तुंबत होते. त्यावेळी त्यांनी किती ठिकाणी पाहणी केली हे माहित नाही.
संपूर्ण जगाला माहित आहे की, २५ वर्षे त्यांनी मुंबईला लुटले असून या काळात त्यांनी मुंबईत कोणतीही सुधारणा केली नाही. मुंबईला बुडण्यापासून वाचवू शकले नाहीत. हिंदमाता चौक येथे पाणी तुंबल्यानंतर दोन तासात निचरा झाल्याचे श्रेय त्यांनी घेतले होते. आज लवकरच पाणी निचरा झाला त्याचे श्रेय उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे साहेबांना द्यायला हवे. जे आता फिल्डवर उतरून पाहाणी करत आहेत. त्यांनी पालकमंत्री असताना लक्ष घातले असते तर बरे झाले असते, असा टोलाही राज्यमंत्री ना. योगेश कदम यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला.
मुंबईमध्ये रस्ता कॉक्रिटकरणाचे काम शिंदे साहेबांनी सुरु केले आहे. ते योग्यच आहे. कारण दरवर्षी रस्ता खड्डेमुक्त करण्यासाठी डांबरीकरणासाठी पैसे खर्च होत होते. आता सिमेंटच्या रस्त्यामुळे १० वर्षे तरी खड्डेमुक्त रस्ते राहातील, कॉंक्रिटीकरणामुळे पाणी तुंबलय असे कोठेही झाले नसल्याचे सांगतानाच राजकारण सोडून नागरिकांना त्रास होणार नाही याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.www.konkantoday.com