
मुंबई गोवा चौपदरीकरणाचे काम डिसेंबर २०२० पर्यंत पूर्ण होणार
मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम डिसेंबर २०२०पूर्ण होणार असल्याची माहिती राज्याचे महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. पाटील हे गेले दोन दिवस रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. काल त्यांनी कशेडी बोगद्याची पाहणी केली. यावेळी खेडच्या आमदार संजय कदम व राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे मुख्य अभियंता विनय देशपांडे व अधिकारी वर्ग उपस्थित होता. कशेडी बोगद्याच्या कामाला सुरुवात झाली असून आतापर्यंत १५०मीटर बोगद्याची खोदाई झाली आहे .बोगद्याचे काम वेळेत पूर्ण होईल असा विश्वास श्री पाटील यांनी व्यक्त केला.
www.konkantoday.com