
झारखंडमध्ये भीषण रेल्वे अपघात, दोन मालगाड्या एकमेकांवर आदळल्याने दोन लोको पायलटचा मृत्यू
झारखंडमध्ये भीषण रेल्वे अपघात झाला असून दोन मालगाड्या एकमेकांवर आदळल्या आहे यामध्ये चालकासह 3 जणांचा मृत्यू झाला आहे.मिळालेल्या माहितीनुसार झारखंडमध्ये मंगळवारी मोठा रेल्वे अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार झारखंडच्या साहिबगंजमध्ये दोन मालगाड्यांची टक्कर झाली आहे. कोळशाने भरलेल्या मालगाडीने रिकाम्या मालगाडीला धडक दिली. या अपघातात दोन लोको पायलटसह तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.