
हातखंबा येथील अपघातात महिलेचा मृत्यू.
मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा तिठा येथे दुचाकीवरून रत्नागिरीकडे येणाऱ्या चालक पतीचा दुचाकीचा तोल गेल्याने ते रस्त्यावर पडले रस्त्यावर पडलेल्या महिलेच्या हातावरून ट्रकची चाके गेल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला.अपघाताची ही घटना रविवार, 16 रोजी दुपारी 2.30 च्या सुमारास घडली.तैसिरा अमीन हिसब (वय 26, मूळ रा. मुंबई, सध्या रा. वडवली लांजा, रत्नागिरी) असे अपघातात मृत्यू झालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. अमिन हिसब आणि तैसिरा यांचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. हिसब दाम्पत्य मुंबईला रहात होते. काही दिवसांपूर्वी हे दाम्पत्य आपल्या गावी वडवली येथे आले होते.
रविवारी दुपारी अमिन हा पत्नी तैसिराला आपल्या ताब्यातील दुचाकीवरुन लांजा ते रत्नागिरी असा घेवून येत होता. त्यांची दुचाकी हातखंबा तिठा येथून जात असताना त्यांच्या दुचाकीच्या पाठीमागून एक ट्रक येत होता. याचवेळी हा ट्रक या दुचाकीच्या जवळ आल्याने अमिनचा तेथील रस्त्याच्या कामामुळे दुचाकीवरील ताबा सुटून दोघेही रस्त्यावर कोसळले.अपघातानंतर तैसिरा रस्त्यावरुन उठेपर्यंत मागून येणार्या ट्रकची चाके तिच्या हातावरुन गेल्याने ती गंभीर जखमी झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला होता. तेथील ग्रामस्थांनी दोघांनाही रिक्षा टेम्पोने तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले