
नेमलेले पदाधिकारी पुन्हा तिथेच राहिले पाहिजेत याची दक्षता घ्या -मंत्री उदय सामंत यांचा ठाकरे यांना टोला.
ऑपरेशन टायगरवरून उद्धव ठाकरे गटात मोठी खळबळ उडाली आहे. राजापूरचे माजी आमदार साळवींच्या शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता कोणाचा नंबर असा सवाल उपस्थित केला जात आहे.मातोश्रीवर ठाकरेंनी आपल्या नेत्यांची बैठक बोलावली होती. यावर शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी मोठे वक्तव्य केले आहे. एखाद्या पक्षातले कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात गेले तर डॅमेज कंट्रोल करावाच लागतो.
त्या पक्षात नवीन पदाधिकारी नेमणूक काही गैर नाही. नेमलेले पदाधिकारी पुन्हा तिथेच राहिले पाहिजेत याची दक्षता मात्र घ्या , असा टोला सामंत यांनी ठाकरेंना लगावला. संजय राऊत यांचा राजापूर दौरा होणार असेल तर ती पक्षाची रणनीती आहे. असलेल्या कार्यकर्त्यांना सांभाळणे ही त्यांची जबाबदारी आहे. निवडणुका झाल्या झाल्या आत्म चिंतनाला सुरुवात झाली असती तर बरे झाले असते. कालच्यासारखे प्रसंग उभे राहिले नसते, असा टोलाही त्यांनी लगावला.