जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांचा मराठा समाज रत्न पुरस्काराने गौरव.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे आज हिंदू समाज जिवंत आहे. त्यामुळे सर्वांनी हिंदुधर्मासाठी जगावे व एकत्र यावे, असे प्रतिपादन जगद्गुरु रामानंदचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांनी केलेअखिल भारतीय मराठा महासंघातर्फे त्यांना मराठा समाज रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक हॉल समोरील मैदानावर हा सोहळा झाला.या सोहळ्याला नागरिक मोठ्या संख्येने होते.

यावेळी बोलताना जगद्गुरुश्री पुढे म्हणाले, ‘ हा पुरस्कार मी माझ्या विचारावर प्रेम करणाऱ्यांना समर्पित करतो. ‘ तुम्ही जगा व दुसऱ्याला जगवा ‘ या विचारांनी मी काम करतो.’त्यांनी आपल्या मनोगतामध्येछत्रपती शिवरायांची गुणवैशिष्टे सांगितली. संस्कार, स्वाभिमान,धैर्य, एकात्म भाव, संघटन कौशल्य आदी त्यांच्या गुणांचा गौरवाने उल्लेख केला.कार्यक्रमाला आमदार. शेखर निकम, आमदार. भास्कर जाधव. आमदार किरण सामंत,माजी आमदार सदानंद चव्हाण. शिवव्याख्याते. नामदेवराव जाधव, दिलीप दादा जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button