
रत्नागिरी पालिकेच्या अग्निशमन दलाने गेल्या वर्षभरात सुमारे ६२० आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळविले
रत्नागिरी पालिकेच्या अग्निशमन दलाने गेल्या वर्षभरात सुमारे ६२० आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळवत मोठे अनर्थ टाळले आहेत. अग्निशमन दलाच्या या तत्परतेचे नेहमीच कौतूक होते. मोकळ्या जागेतील गवत, कचरा, पालापाचोळा यांना आग लागण्याचे प्रकार अधिक आहेत. शॉर्ट सर्किटमुळेही आग लागण्याचे प्रकार घडले आहेत. या घटनांमध्ये सुमारे १२ ते १३ लाखांचे नुकसान झाले आहे.
रत्नागिरी अग्निशमन दलाला गेल्या चार वर्षामध्ये काहीसे बळ मिळाले आहे. दलामध्ये अत्याधुनिक वाहने दाखल झाली आहेत. अन्यथा एका अग्निशमन बंबावर अवलंबून रहावे लागत होते. त्यानंतर फिनोलेक्स कंपनीचाच मोठा आधार होता. परंतु आता तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या प्रयत्नामुळे एमआयडीसीतही स्वतंत्र अग्निशमन दल उभारण्यात आले आहे. त्यामुळे कुठेही आग लागली तरी या तिन्ही दलातर्फे आगीवर नियंत्रण मिळविता येते. www.konkantoday.com