
कायदा मंत्री मेघवाल यांना लेखक ऍड. विलास पाटणे यांच्याकडून रामशास्त्री पुस्तक भेट.
केंद्रीय कायदामंत्री अर्जुन मेघवाल यांची रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि लेखक ऍड. विलास पाटणे यांनी संसदेत भेट घेतली. याप्रसंगी ऍड. पाटणे यांनी स्वतः लिहिलेले रामशास्त्री हे पुस्तक भेट दिले. रत्नागिरी ही लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुण्यभूमी आहे. यामुळेच मेघवाल यांना रत्नागिरीचे आकर्षण असून त्यांना रत्नागिरी भेटीचे निमंत्रण ऍड. पाटणे यांनी याप्रसंगी दिले.
श्री. मेघवाल यांनी पाटणे यांच्या लेखन आणि पुस्तकांसंबंधी आस्थेने चौकशी केली. साहित्यिक ऍड. पाटणे यांच्यासमवेत भेटीप्रसंगी केंद्रीय उर्जामंत्री श्रीपाद नाईक उपस्थित होते. श्री. मेघवाल हे सलग चार वेळा बिकानेरमधून (राजस्थान) संसदेवर निवडून गेले. तीन वेळा सर्वोत्कृष्ट संसदरत्न पुरस्काराने त्यांचा गौरव झाला आहे.www.konkantoday.com