
विद्यार्थ्यांच्या पाठिवरचे ओझे नवीन शैक्षणिक वर्षापासून वाढणार.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीला आता परत एकदा पूर्वीप्रमाणेच पुस्तके प्रकाशित करण्यात येणार आहेत. पुस्तकात वह्यांची पाने समाविष्ट करण्यात येणार नसून मुलांना स्वतंत्र वह्या रोजच्या दप्तरातून शाळेत घेवून याव्या लागणार आहेत. नुकताच तसा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.इयत्ता दुसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात वह्यांची पाने समाविष्ट करून पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले होते.
या योजनेचा उद्देश दप्तराचे ओझे कमी करणे असा होता. परंतु विद्यार्थी पुस्तकांसह सोबत वह्यादेखील घेवून येत होते. ही बाब लक्षात घेता, आता येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच २०२५-२६ पासून पूर्वीप्रमाणेच नियमित पाठ्यपुस्तके वितरित करण्यात येणार आहेत. यात वह्यांच्या पानांचा समावेश असणार नसल्याने पालकांना वह्या विकत घ्याव्या लागणार आहेत.www.konkantoday.com