
सेवानिवृत्त पोलिसांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार – अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड
सेवानिवृत्त पोलीस कर्मचार्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करणार आहे, त्यासाठी तीन महिन्यातून एकदा बैठकदेखील आयोजित केली जाईल, त्यामुळे भविष्यात सेवानिवृत्तांना कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही, असे आश्वासन अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी दिले.सेवानिवृत्त पोलीस कर्मचार्यांचा स्नेहमेळावा गुरूवारी साळवी स्टॉप येथील श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालयात पार पडला. यावेळी पोलीस उपअधीक्षक (गृह) राधिका फडके, रत्नागिरी विभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य आशिष बर्वे, सेवानिवृत्त पोलीस कल्याणकारी शिखर संस्था अध्यक्ष संपतराव जाधव, रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष विलास भोसले, संघटनेचे अध्यक्ष ओंकार चाळके, निवृत्त पोलीस उपअधिक्षक उल्हास भोंगले, अरविंद सावंत आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमात राधिका फडके म्हणाल्या की, सेवानिवृत्त कर्मचार्यांसाठी स्नेहमेळावा हा अत्यंत चांगला उपक्रम आहे. जुन्या आठवणी, सुख-दुख वाटून घेण्यास मदत होते. एक वर्षानंतर आपणही सेवानिवृत्तांच्या पंगतीत बसणार असल्याचे फडके यांनी सांगितले. सेवानिवृत्त पोलीस कल्याणकारी शिखर संस्थेचे अध्यक्ष संपतराव जाधव यांनी शासनाकडून मिळणारे आमचे कायदेशीर हक्क आम्ही सोडणार नाही असे सांगत सेवानिवृत्तांना येणार्या अडचणी व मागण्या सर्वांपुढे ठेवल्या.www.konkantoday.com