महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा शिरकाव; हजारो कोंबड्या-अंडी नष्ट
ऊरण पाठोपाठ नांदेडमध्ये हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. हजारो कोंबड्या आणि अंडी नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे 10 किलोमीटर परिसरात हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यातील किवळा इथं मृत कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.त्यामुळे पशूसंवर्धन विभागानं परिसरातील कोंबड्या आणि अंडी नष्ट केली आहेत.
पशू संवर्धन विभागानं आता परिसरात उपाययोजना सुरू केल्या आहेत. नागरिकांनीही कोंबड्याचं मांस खाताना शिजवून घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच प्रशासनाने नागरीकांनी भीती बाळगू नये असंही सांगण्यात आलं आहे.महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील ढालेगाव येथील एका पोल्ट्री फार्ममध्ये अलिकडेच 4000 हून अधिक पिल्लांचा मृत्यू झाल्याने बर्ड फ्लू होण्याची शक्यता वाढली आहे. यापूर्वी उदगीरमध्ये बर्ड फ्लूमुळे 50 कावळ्यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे.