
मातोश्री बाहेर आंदोलन झालं होतं, ते सर्व लोक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लोक-संजय राऊत यांचा आरोप
* _मुंबईमध्ये सुपारीचं काम जास्त चालतंय, हे काम दिल्लीमधून होतंय. मातोश्रीवर जे आंदोलन झालं, ते खास सुपारी देऊन पाठवलेले लोक होते, असा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी केलाय.मातोश्रीबाहेर आंदोलन झालं होतं, ते सर्व लोक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लोक होते. मातोश्रीबाहेर वक्फ बोर्डाच्या बिलाच्या निमित्ताने दहा-वीस लोक आले अन् घोषणाबाजी करून गेले. काहीही कारण नव्हतं, अजून या बिलावर संसदेत चर्चा व्हायची आहे. पण दरम्यान मातोश्रीवर आंदोलन झालं.मातोश्रीच्या बाहेर १० ते १२ लोक आलेले होते. ते लोक कोणी पाठवलेले होते? ती सुपारी कोणाची होती? याचे सर्व पुरावे आहेत. आमच्या विरोधात नारेबाजी करणारे लोक वर्षावर राहणारे होते. त्या लोकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठवलं होतं, असं म्हणत संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत फोटो दाखवले आहेत. पुरावे दाखवत संजय राऊत यांनी अकबर सय्यद, सलमान शेख, अफराफ सिद्धिकी, अक्रम शेख हे यांचे फोटो दाखवले आहेत.