मिळालेल्या यशास गालबोट लावणे हे महायूतीसाठी योग्य नाही-खासदार सुनील तटकरे.

विधानसभा निवडणूकीत महायूतीस मिळालेल्या प्रचंड यशानंतर राज्याचे मुख्यमंत्र्यांसह प्रमुख मंत्री दावोस येथे परकीय गंतवणुक आणण्यासाठी गेलेले असताना पालकमंत्री पदाबाबत प्रश्न निर्माण करुन मिळालेल्या यशाला गालबोट लावण्याचे कृत्य अनाकलनीय असून महायुतीचे शासनास शोभनीय नसल्याचे स्पष्ट मत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केले.

23 जानेवारी 2025 रोजी मंडणगड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचेवतीने आयोजीत नागरी सत्कार सोहळ्यानंतर भिंगळोली येथील श्रीकृष्ण सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले परस्पर समन्वय राखून पालकमंत्रीपदासह सर्व विषयावरील समस्यांचे समाधान शोधले जाईल यावेळी पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना तालुका व मतदार संघाचे विविध समस्यांवर संवाद साधला व नजीकच्या काळातील विविध प्रश्नांवर भुमिकाही स्पष्ट केली.

यामध्ये आंबडवे गावाचे आदर्श संसद ग्राम योजनेसंदर्भात विशेष बैठक आयोजीत करणार असल्याचे सांगीतले. तसेच मंडणगड तालुक्यातील पर्यटन जलमार्ग दळणवळण याबाबत विशेष मंडणगड पर्यटन विकास आरखडा तयार करण्यात येणार असुन त्याबाबतच्या नागरीकांच्या सुचना व प्रस्ताव त्यांचेकडे सादर करण्याचे आवाहन यावेळी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button