
शिवसेनेत आलेल्या उबाठाच्या कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही -आमदार किरण सामंत.
राजापूर तालुक्यातील शिवसेनेचे (उबाठा) कोदवली विभागाचे उपविभागप्रमुख योगेश नकाशे यांच्या नेतृत्वाखाली कोदवली विभागातील चिखलगाव, गोठणे-दोनिवडे, खरवते, पाथर्डे, कोदवली, धोपेश्वर, केळवंडे, शेंढे, धोपेश्वर-पन्हळे आदी गावातील शेकडो कार्यकर्त्यांन शिवसेनेत प्रवेश करीत खांद्यावर भगवा व हातामध्ये धनुष्यबाण घेतला. त्यांचे आमदार किरण सामंत आणि शिवसेना पदाधिकार्यांनी जोरदार स्वागत केले.
शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश केलेल्या शिवसेना (उबाठा गट) च्या कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय केला जाणार नाही. त्यांचा पक्षामध्ये योग्य प्रकारे मान-सन्मान करताना त्यांना अपेक्षित असलेल्या विकासकामांची निश्चितच पूर्ती करू, अशी ग्वाही आमदार किरण सामंत यांनी येथे दिली.www.konkantoday.com