शहरात फेरीवाले वाढल्याचा साक्षात्कार नगरपरिषदेला झाला ,कारवाई सुरू


सध्या शहरात फेरीवाल्यांची संख्या वाढल्याचा साक्षात्कार रत्नागिरी नगरपरिषदेला झाला त्यामुळे त्यांनी सणाच्या तोंडावर फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे
रत्नागिरी शहरात गेल्या काही दिवसात जागोजागी फेरीवाले मुक्काम ठोकून आहेत मात्र
या पार्श्वभूमीवर संभाव्य धोके टाळण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेच्या पथकाने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली. मंगळवारी अनेक फेरीवाल्यांचे वजनकाटे, फळे, फुले, जप्त करण्यात आले.
गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी अशा उत्सवांची मालिका सुरु होत आहे. दहीकाला, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फळविक्रेत्यांचे प्रमाण वाढले आहे. शहरातील रस्त्यांवर पाहावे तेथे फळविक्रेते दिसत आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोलकी विक्रेते व इतर सुशोभिकरणाच्या वस्तूही रस्त्यावर बसून विकल्या जात आहेत. काहींनी तर ही दुकाने थाटण्यासाठी शेडही बांधल्या आहेत. त्यामुळे शहर बकाल होऊ नये, यासाठी मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याच्या सूचना अतिक्रमण हटाव मोहिमेच्या पथकाला केल्या. मालमत्ता विभागाचे अधिकारी नंदकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखालील अतिक्रमण हटाव मोहीम पथकाने मंगळवारपासून शहरात कारवाई सुरू केली. या कारवाईत अनेक ठिकाणची फळे, फुले वजनकाटे जप्त करण्यात आले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button